विहीरगाव येथे वीज पडून बैल ठार
विहीरगाव/राजुरा, १२ सप्टें. :- सध्या वरून राजाची दमदार एन्ट्री रोजच होत असल्याने शेतीकामे खोळंबली आहेत. वर्धा नदीला पूर येऊन नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकाचेही पुराने मोठे नुकसान झाले आहे. आज दुपारी ३:३० सुमारास पावसाने कडकडाटासह हजेरी लावली. या पावसात वीज पडून विहीरगाव येथील राहुल लिंगा मडावी या शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची घटना घडली.








