बुद्धगया येतील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंदर्भात वंचितचे राष्ट्रपतींना निवेदन
महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध धर्मीयांच्या हाती द्यावे..!
बल्लारपूर : बिहार बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंदर्भात बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी विसापूरच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांना बल्लारपूर तहसीलदार मार्फत महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये बुद्धगयातील महाबोधी महाविहार 1949 च्या व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करावे. या ॲक्टमुळे बुद्धगया येथील महाबोधि महाविहार व्यवस्थापनामध्ये इतर धर्मियांची संख्या जास्त असल्यामुळे महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन योग्यरित्या होत नसल्याने जगभरातील बौध्द अनुयायांमध्ये असंतोषाचे वातावरण असल्यामुळे महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्ध धर्मीयांच्या हाती देण्यात यावे व बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात येऊन जगभरातील व विदेशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनांच्या विचार व आदर करून 1949 च्या व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्त करावा व तात्काळ बुद्धगया येथील महाबोधि महाविहार मुक्त करण्यात यावे ही मागणी वंचित बहुजन आघाडी विसापूरच्या वतीने राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे सादर केली आहे. यावेळी वंचित युवा जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर, महिला तालुका उपाध्यक्ष सुशिलाताई नगराळे, महीला आघाडी अध्यक्षा रीना कांबळे, सुनीता पुडके, किरण वैद्य, शालिनी जयकर, निर्मला बहादे, सुशीला जगताप, नीलजय गावंडे, समीर शेख,शैलेश तलसे,सुविभ उमरे,संकेत खांडेकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.