तालुका प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे
अमरावती/ चांदूर बाजार (कृष्णापुर):- संपूर्ण विश्वासाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध याची 2565 वी जयंती,याच दिवशी तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली.तर याच दिवशी तथागतांचे महापरिनीर्वान झाले. त्यामुळे या वैशाखी.पोर्णीमेला विशेष महत्व आहे. संपूर्ण विश्वातील बौद्ध बांधव मोठ्या उत्साहाने हा उत्साहात साजरा करतात.1956 ला प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यानी आपल्या लाखो अनुन्यांसोबत बौद्ध धम्माची दिक्षा घेतली तेव्हापासून देशात भिमजयंती सोबतच.बुद्ध पोर्णीमा ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते..
याच अनुषंगाने राहुल नगर बिच्छू टेकडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वतीने खिचडी वाटप करण्यात आला.यावेळी आनंद खातरकर सदस्य जिल्हा कार्यकारणी रिपाई ,अतिष डोंगरे शहर महासचिव रिपाई, संदीप मानकर ब्लॉक.अध्यक्ष अम रिपाई, आनंद इंगळे( संपादक दै. लोक मंडल)
एम.एम.खंडारे व युवा कार्यकर्ते उपस्थित होते