शालेय पोषण आहाराचा बट्ट्याबोळ

0
25

शालेय पोषण आहाराचा बट्ट्याबोळ

 

मागील दोन महिन्यापासून तांदूळच नाही

 

आमदाराने केली मंत्र्याकडे चौकशीची मागणी

 

कोरपना :- शालेय विद्यार्थी भोजनापासून वंचित राहू नये या करीता शासनाने मध्यान्ह भोजन सुरू केले मात्र मागील तीन महिन्या पासून शालेय पोषण आहार त्यात तांदुळ हा शाळेपर्यंत पोहचला नसल्याने तब्बल दोन महिन्या पासून विद्यार्थांना भोजन आहार पासून वंचित राहावे लागत असल्याने शालेय पोषण आहाराचा बट्ट्याबोळ झालेला दिसून येत आहे.

 

कोरपना तालुक्यात तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मागील डिसेंबर – २०२४ पासून शालेय पोषण आहार मिळणे बंद आहे. कोरपना तालुक्यात एकूण १७६ शाळा आहेत त्यापैकी जिल्हा परिषदेचा १११ शाळा आहेत त्यापैकी जवळपास ७० शाळांमध्ये पोषण आहारा अभावी मुले उपाशी आहेत. ही पोषण आहाराची समस्या फक्त तालुक्या पूर्तीच मर्यादित नसून जिल्ह्यातही हीच विदारक परिस्थिती दिसून येत आहे.

 

एकीकडे राज्यात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत शिजवलेला पोषण आहार दिला जातो तसेच केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थांच्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा, वस्तीशाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्रे या ठिकाणी सुद्धा शालेय पोषण आहार योजना राबिविली जात आहे. मात्र मागील दोन महिन्या पासून तांदूळच उपलब्ध होत नसल्याचे अनेक शाळेत खिचडीच शिजत नाही परिणामी विद्यार्थांना भोजना पासून वंचित राहावे लागत आहे.

 

ही अत्यंत गंभीर बाब शिक्षण विभागाचा उडवा उडवी उत्तरातून नुकत्याच झालेल्या आमदार आढावा बैठकीतून समोर आली आहे.

 

श्रीमती माया सोणवणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. चंद्रपुर यांचे हलगर्जीपणामुळे मागील डिसेंबर – २०२४ पासून संबधित ऑनलाईन पोर्टलवर जिल्ह्याचा योग्य डाटा न दिल्याने यासंदर्भांत श्रीमती. माया सोणवणे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचेकडे वारंवार विचारणा केली असता त्यांचेकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. खरंतर शिक्षणासारख्या पवित्र खात्यात उच्च पदावर कार्यरत असतांना अशी कर्तव्याधीन वर्तवणुक अपेक्षित नसते. करिता, या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष घालून जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीबांच्या मुलांना उपाशी ठेवणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांचेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे कडे केली आहे. – आमदार देवराव भोंगळे, राजुरा विधानसभा क्षेत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here